
सध्या उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईने तीव्र स्वरूप धारण केले असून पैनगंगा नदी पात्रात पाणी नसल्याने नदी काठावरील गावांचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनत चाललाय आहे .याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेत आज दिनांक 21 रोजी एप्रिल रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात बैठक घेऊन पाणी प्रश्न सोडवणार असल्याचे आमदार किसन वानखेडे यांनी यावेळी सांगितले .
मागील काही दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे मात्र अद्यापपर्यंत पाणी टेलपर्यंत पोहचल्या नसल्याने अन्य गावात पाणी टंचाई सदृश स्थिती निर्माण झाली आहे . याबाबत नांदेड जिल्हाधिकारी आणि यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्यासोबत पाणी सोडण्या संदर्भात वारंवार बोलणे झाले मात्र काही तांत्रिक बाबींमुळे पाणी हे शेवटपर्यंत पोहचले नाही . त्या संदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आज दिनांक 21 एप्रिल रोजी एसडीओ कार्यालयात आयोजित करण्यात आली होती .
सदर बैठकीस आमदार किसनराव वानखेडे यांनी व भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी पाणी सुटल्यानंतरही पाणी शेवटच्या टोकापर्यंत का पोहोचले नाही याचा जाब अधिकाऱ्यांना यावेळी विचारून यावर येत्या तीन दिवसात उपाययोजना राबवून पाणी नागरिकांना मिळाले पाहिजे यासाठी काय काय उपाय योजना कराव्या लागतील या संदर्भात चर्चा केली असता तीन दिवस सर्व विभागाचे पथक घेऊन नदीकाठावरील सोडण्यात आलेले पाणी कुठे कुठे नदी नाले व बंधाऱ्यामध्ये अडविले असल्याचे दिसून येतात ते बंधारे ते नाले संबंधित शेतकरी यांना मोकळे करून देण्याच्या सूचना देण्यात येतील तसेच दोन्ही कडील विदर्भ व मराठवाड्या कडील मोटर पंप यांचा विज पुरवठा हा त्वरित खंडित करण्याचे निर्देशही यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले . अनेक गावात पाणी असतानाही जे पाणीटंचाई असल्याचे भासविण्यात येत आहे . केवळ ज्या कारणाने त्या गावातला पाणीपुरवठा खंडित झाला आहे ते कारण शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी दिल्या असून अनेक ठिकाणी केवळ विद्युत पुरवठा हा विहिरीवर मोटर पंप न बसल्यामुळे पाणीपुरवठा त्या गावाला मिळत नाही अशा प्रकारच्या तक्रारी असून मुळात तालुक्यात कुठेच पाणीटंचाई एवढी तीव्र अजून झालेली नाही त्यावर प्रशासनाचे नियंत्रण असून ईसापुर धरणात सध्या 52 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे .जर पाणीटंचाई संदर्भात काही तक्रारी आल्या तर त्यांची शहानिशा करून त्वरित त्यावर उपाययोजना शोधण्याचेही यावेळी मुळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या .यावेळी अधिकाऱ्यांना कडक शब्दात आमदार किसनराव वानखेडे यांनी सांगितले की, ईसापुर धरणाचे पाणी नदी पात्रात आले असताना देखील शेवटपर्यंत पाणी का पोहोचले नाही अनेक तक्रारी गावागावातून येत आहेत . त्यामुळे त्वरित पथके निर्माण करून येत्या तीन दिवसात पाणी शेवटपर्यंत पोहोचले पाहिजे असे निर्देश दिले असून कुठूनही पाण्यासंदर्भात तक्रारी आल्या नाही पाहिजे याची दक्षता येणाऱ्या या दीड महिन्यात अधिकाऱ्यांनी द्यावी जेणेकरून पाणीटंचाई नसताना देखील जोआगडोंब होतो आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी ही अधिकाऱ्यांनी समोर येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले .
सदर बैठकीस माजी आमदार विजय खडसे, विनायक राणे, सुदर्शन रावते ,यासह सावळेश्वर, माणकेश्वर ,कोटा तांडा ,मुरली या गावातील नागरिकासह उर्द्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता अभय जगताप ,तहसीलदार राजेंद्र सुरडकर ,गटविकास अधिकारी किरण कोळपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जैन , उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे सचिन मुटकुळे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता .
◆बॉक्स- पाणी नदीपात्रात सुटले आहे पण शेवटपर्यंत आतापर्यंत का पोहचले नाही याची कारणमिमांसा करण्यासाठी आजची बैठक होती . या बैठकीत येत्या तिन दिवसात शंभर टक्के पाणी शेवटच्या मुरली , परोटी पर्यंत पोहचेल यासाठी कर्मचारी पथके निर्माण करून नदिकाठावर प्रत्यक्ष जावुन पाहणी करून अनधिकृत मोटर पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करणे , अडविलेले बंधारे मोकळे करणे हे राबविण्यात येणार आहे . त्यामुळे पाणीटंचाई तालूक्यात नाही केवळ उपाययोजना होत नसल्यानेच आज प्रशासनाला निर्देशीत केले आहे .
नितिन भुतडा
भाजपा,यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक .
◆बॉक्स- पाणी टंचाई तालूक्यात नसतांना प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी पाणी टंचाई असल्याचे भासविण्यात येत आहे . मुळात इसापूर धरणाचे पाणी सुटले आहे परंतू ज्या कारणाने पाणी टेलपर्यंत पोहचले नाही त्यामुळे ते शोधण्यासाठी व तालूका पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे .
सखाराम मुळे
उपविभागीय अधिकारी, उमरखेड