
मंगरूळ (कारखाना) प्रतिनिधी: हर्षनंदा वाकोडे
सध्या वांगे आणि टोमॅटोचे भाव एकदम कमी झाल्याने हे पीक लवकर खराब होत असल्याने लवकर विकल्याशिवाय पर्याय नाही परंतु या भावात लावलेला खर्च निघत नसल्याने येथील बाजाराभावा मध्ये चिल्लर विक्रीसाठी पाच रुपये किलो वांगी ,पाच रुपये किलो टमाटे आहे तर खरंच शेतकरी भाजी मंडी मध्ये काय भाव विकत घेत असेल असा प्रश्न मोठ्या प्रमाणात कुणालाही पडतअसल्याने त्यात शेतकऱ्यांचा वाहनाचा खर्च स्वतःचा खर्च पिकाला लागणारा खर्च कुठून येत असेल ?असा प्रश्न पडतो. वांगे टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चांगला संकटात आहे. पावसाळ्यात भाजीपाल्याचे भाव चांगलेच कडून महागले होते. 80 रुपये किलो टमाटे 40 रुपये किलो वांगे आणि इतर भाजीपाल्यांनाही चांगलाच भाव होता. आता पावसाळ्याच्या दिवसात सर्वसाधारण व्यक्तीचे विकत घेता घेता कंबरडले मोडले होते. परंतु आता उन्हाळ्याच्या दिवसात तर शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे..! वांगे , टमाट्याचे भाव कशामुळे कमी झाले असावे सध्याचे वातावरण भाजीपाला पिकासाठी पोषक आहे .त्यामुळे अनेक जो शेतकरी स्वतः भाजीपाला विकतो त्यांचा थोडाफार फायदा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मंगरूळ चा बाजार भाव: वांगी पाच रुपये किलो, टोमॅटो पाच रुपये किलो, पत्ता कोबी दहा रुपये गड्डा ,फूलगोभी दहा रुपये गड्डा , पालकमेथी कोथिंबीर पाच रुपये जोडी, फणस तीस रुपये पाव ,शिमला मिरची चाळीस रुपये किलो, कांदे पंधरा रुपये किलो ,लसूण शंभर रुपये किलो, बटाटा 40 रुपये किलो, गवार 20 रुपये किलो, भेंडी दहा रुपये किलो. अशाप्रकारे मंगरूळ चा बाजार भाव आहे त्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.