उमरखेड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अनेक कारणाने गाजत आहे .या कार्यालया अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र अंतर्गत येत असलेले कर्मचारी एक दोन सोडले इतर ठीकाणचे मुख्यालयी राहतच नाहीत हा प्रकार तक्रार करूनही सुधारलेला दिसत नाही .प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र कमीत कमी दोन वैद्यकीय अधिकारी आहेत ; एकाने ओपीडी केली तर दुसऱ्याने उप केंद्रांतर्गत येत असलेल्या गावाला भेटी देऊन रुग्णांची तपासणी केली पाहिजे पण हा नियम या ठिकाणी सब सेल मोडला जातो .ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हप्त्यातून तीन दिवस ओपीडी केली तो बाकी दिवस गैरहजर राहतो म्हणजे तो महिन्यातून पंधरा दिवस ड्युटीवर हजर राहतो हे सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला माहित आहे परंतु त्यांची मासिक उपस्थिती मात्र शंभर टक्के दाखविली जाते व पूर्ण महिन्याचा पगार निघतो .या काम चोरीमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोडमोडलेली असून कोणतेही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे दिसून येत आहे . यापूर्वी सुद्धा अनेकदा तक्रारी केल्या परंतु सूचना पत्र देण्याच्या पलीकडे कोणतीही कारवाई तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने केलेली नाही . मुळावा येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने संगणमत करून 2022 -23 मध्ये गैरहजर असलेल्या डॉक्टरचे एक वर्षाचे पगार काढले .मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राचा लिपीक जाधव हा प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथील सर्व लेखी स्वरूपाचे कामकाज पाहतो . ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिक असताना सुद्धा त्याच्याकडे चार्ज का नाही काय गोडबंगाल आहे ; तक्रारी करूनी चौकशी का होत नाही .आजही तालुक्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत उपकेंद्रात तर राहतच नाहीत .कोणाचे कोणावर नियंत्रण नाही .कागदी घोडे नाचविण्यापलीकडे कारभार नाही . याला सर्वस्वी तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जबाबदार असल्याचे दिसून येत असल्यामुळे उमरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर आंबेजोगाईकर व विजय कदम यांनी राज्याचे आरोग्य मंत्री व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करून याची गंभीरपणे चौकशी करण्याची मागणी केले आहे .कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे .तालुक्यातील जनप्रतिनिधी झोपलेले आहेत त्यांना स्वागत समारंभातून आणि लग्न कार्यास हजर राहण्या पलीकडे कोणतेही काम नाही .जिल्हाधिकारी निष्क्रिय झाले आहेत .तक्रारी तरी किती करायच्या याची जाण- भान लाज वरिष्ठ अधिकारी या नात्याने वरिष्ठांनी संभाली पाहिजे .सध्या सर्व व्यर्थ असून दिन जाव फुकट पगार खावा अशी अवस्था आहे.