
मान्सून दाखल झालेला असून सर्व शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे. पेरणी योग्य पाऊस पुढील दोन तीन दिवसात होईल असे हवामान खात्याचे मत आहे. आपल्या उमरखेड भागा मध्ये सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असून प्रमाणित व दर्जेदार बियाणे मिळणे महत्वाचे झाले आहे. बियाणे नवे असो किंवा घरचे जुने बियाणे, पेरणी पूर्वी सदर बियाण्याची उगवण क्षमता तपासणे अत्यावश्यक झाले आहे.
बियाणे उगवण क्षमता तपासून पेरणी केल्यास शेतकऱ्याचा अनावश्यक खर्च कमी होऊन झाडांची सरासरी प्रमाण राहण्यात मदत होते. तरीही सर्व शेतकऱ्यांनी पेरणीअगोदर उगवण क्षमता तपासून पेरण्या कराव्या असे आव्हान कृषीदुतांन मार्फत करण्यात आले.
कृषी महाविद्यालय उमरखेड येथील कृषीदुतांनी ग्राम बारा येथे बिज उगवण क्षमते बाबत उपस्थित शेतकरी वर्गास मार्गदर्शन केले. बिज उगवण महत्वाची का ? का करावी ? याप्रमाणे कृषीदुतांनी शेतकऱ्यांच्या शंकेचे निराकरण केले.
सदर मार्गदर्शन करण्याकरिता प्राचार्य. श्री. एस.के. चिंतले ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी श्री. ए. बि. इंगळे , श्री. वाय.एस. वाकोडे कार्यक्रम समन्वयक श्री. ए. एस.राऊत तसेच विषय तज्ञ डॉ. एस. बि. मातीखाये यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी गावातील सरपंच सौ. साधना शामराव हारणे ,उपसरपंच नागाराव हारणे, ग्रामसेवक आर. शाह , तंटामुक्ती अध्यक्ष दत्तराव सुरोशे व उपस्तित गावकरी मंडळी यांना सदर मार्गदर्शन करण्याकरिता कृषीदूत भुवनेश भांगे , प्रणव भांगे , सुहास नलेवाड , संस्कार मुक्कावार, गौरव बावणे, सुमित बोरकर , शुभम साखरे , ऋषिकेश कदम हे सर्व उपस्थित होते.