
लोकहित लाईव्ह न्युज मंगरूळ कारखाना प्रतिनिधी : हर्षनंदा वाकोडे
दि. ३ जून २०२५ मंगरूळ येथून जवळ असलेल्या साकुर (हेटी) या गावामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना साकुर ग्रामपंचायत ने ठराव घोषित करून ११ शेतकऱ्यांच्या शेतीवर ताबा करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर जणू काही पहाडच कोसळला आहे. एकदा सौर ऊर्जेचा डाव शेतकऱ्याने पाडून टाकल्याने थेट प्रकरण यवतमाळ ग्रामीण पोलिसात गेले. त्यामुळे शेती खाली करण्यासाठी पोलिसांकडून सांगण्यात आले. शेतामध्ये ऊस तिळाची लागवड केलेली आहे .त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट आल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्व शेतमजूर त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीवर त्यांचे जीवन अवलंबून आहे .शेत सर्वे नंबर ५४ व ५५ आणि ५६ ही क्लासची जमीन असून शासनाची आहे १९७९ सन अतिक्रमण करून तेव्हापासून उदरनिर्वाह शेतकरी करीत आहे. या शेतीबाबत महसूल विभागात दंड भरला असून त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगला त्यामुळे आमची शेती आमच्या ताब्यात राहू द्या अशी धडपड शेतकऱ्यांतून होत आहे. शेतकऱ्याकडे सगळे पुरावे असताना सुद्धा शेतकऱ्याला सातबारा सुद्धा शासनाने दिलेला आहे .हेच जमीन सौरऊर्जेसाठी का निवडली याबाबत प्रश्न निर्माण होत आहे? जंगलाच्या शेजारी इ क्लास ची जमीन भरपूर असताना सुद्धा हीच जमीन का निवडली याबाबतही नवे नवे प्रश्न निर्माण होत होताना दिसत आहे . आमची शेती सौरऊर्जे कडे न देता आमच्याकडेच राहू द्या यासंदर्भात माननीय जिल्हा अधिकारी आणि माननीय आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडे निवेदनातून तक्रार दिली आहे.
यामध्ये तक्रार करते ,स्वानंद गायकवाड ,उत्तम काळे, गंगाराम लोणकर, बेबी बोरकर, मारुती कलाने, किसन टेंबरे ,देवानंद वाकोडे, प्रल्हाद गजभार ,नितीन खरतडे, दिगंबर भगत, महादेव तेलंगे , आदी शेतकरी उपस्थित होते.