
उमरखेड येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहातील गृहपाल श्रीमती स्नेहलता राजने यांना समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निलंबित केले आहे .अमरावती येथील श्रीमती सरिता बोबडे समाज कल्याण अधिकारी गट ब प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग यांच्या पथकाने दिनांक 31 3 2025 रोजी मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह उमरखेड जिल्हा यवतमाळ या वस्तीगृहातील प्रवेशित विद्यार्थिनीवर अत्याचार झालेल्या घटनेबाबत तपासणी करून अहवाल सादर केला होता त्यात वस्तीगृहाच्या ठिकाणी गृहपाल राजने ह्या पूर्ण वेळ व पूर्ण दिवस रहात नसल्याचे व वरिष्ठांची परवानगी न घेता दिनांक 21/3/25 ते 24 /3 2025 पर्यंत वरिष्ठांच्या विनापरवानगी शिवाय गायब होत्या . या दरम्यान एक मुलगी वस्तीगृहातून एका ड्रायव्हर सोबत गायब झाली होती या संदर्भात उमरखेड पोलीस स्टेशनला बलात्कार -पोस्को व ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झालेला आहे ह्या राजणे मॅडम वस्तीगृहात हजर नसत राहत नसल्या बाबदच्या बातम्या सुद्धा वर्तमानपत्रातून व सोशल मीडियातून प्रसारित झालेल्या होत्या. अग्निबाण लाईव्ह न्युज चैनलचे संपादक डॉक्टर आंबेजोगाईकर व लोकहित लाईव्ह न्युज चॅनलचे संपादक विजय कदम यांनी दिनांक 24 मार्च 2025 रोजी मागासवर्गीय शासकीय मुलींचे वस्तीगृह येथील गृहपाल यांची चौकशी करून निलंबन करावे अशा आशयाची तक्रार दाखल केली होती. आपल्या अनुपस्थितीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी त्यांनी या घटनेपूर्वी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांना बोलावून मुलींना नियमाप्रमाणे जेवण मिळत नसल्याची तक्रार करून ठेकेदाराचा ठेका काढून घेतल्याचा प्रकार घडलेला होता अनेक काळे कारनामे ह्या pवस्तीगृहात सुरू असल्याची कुणकुण शहरात सुरू आहे त्यांच्या बेशिस्त पणाचा परिणाम वस्तीगृहावर होत असल्यामुळेच ती अप्रिय घटना घडल्या असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे आणि त्यांना सुद्धा पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे .शासकीय मुलींचे – मुलांचे तसेच मागासवर्गीय व आदिवासी निवासी वस्तीगृहात सुद्धा मुलांना दूध -तूप दिले जात नसल्याची गंभीर बाब असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आहे .सध्या तरी कोणत्याही वस्तीगृहामधून मुलांना तूप दिले जात नंसल्याचे दिसते .असे वस्तीगृह हे भ्रष्टाचाराचे व अनैतिक गोष्टीचे केंद्र होत आहेत का याची गंभीरपणे चौकशी करण्याची गरज आहे.