
गुरुवार दिनांक 13 मार्च 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांनी मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाला अचानक भेट देऊन गृहपाल एस एस राजने व मुलींना भेटून वस्तीगृहातील समस्या जाणून घेऊन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ साहेब व समाज कल्याण अधिकारी यवतमाळ माधुरी मिसाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला व उमरखेड येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या परिस्थितीबद्दल कळविले.उमरखेड येथील सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह मधील मुलींची भोजन ठेकेदार यांचे विरुद्ध अनेक वेळा वस्तीगृहाचे गृहपाल एस एस राजने यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली.वेळोवेळी गृहपाल यांनी भोजन ठेकेदार यांना कळविले की अनेक मुलींच्या भोजनाविषयी तक्रारी येत आहेत. स्वयंपाक वाली बाई यांच्याशी विचारणा करून पाहणी केली असता वस्तीगृहातील मेस मध्ये कोणतेच सामान भाजीपाला व कोणतीच फळ दिसून आली नाही.वस्तीगृहाचा गॅस संपला तर गॅस सुद्धा लवकर येत नाही. मुलींनी अनेक वेळा तक्रारी केल्या व भोजन ठेकेदार यांना कळविले परंतु भोजन ठेकेदार यांनी गृहपाल व मुलींना सुद्धा अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये शिवीगाळ केली.वस्तीगृहातील मुलींना वेळेवर व व्यवस्थित भोजन मिळत नाही.शासनाच्या नियमाप्रमाणे नाष्टा जेवण व सुद्धा मिळत नाही.जेवणाची क्वालिटी तर अतिशय निकृष्टि दर्जाची आहे.भोजन ठेकेदार हे यवतमाळ जिल्ह्यातून सुकलेला भाजीपाला स्वयंपाकासाठी लागणारे मटेरियल व फळ सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाची पाठवीत असतात. अनेक वेळा मुली बाहेर जाऊन नाश्ता करतात किंवा उपाशी पोटीच राहतात. अशा या निकृष्ट खाण्यामुळे अनेक मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे.अनेक मुली ह्या बीमार पडत असल्यामुळे गावाकडे जातात. निकृष्ट दर्जाचे भोजन देणाऱ्या भोजन ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी.त्यांचा ठेका काढून घ्यावा अशी मागणी शासकीय वस्तीगृहातील मुलींनी नितीन भाऊ भुतडा यांना केली.यावेळी उमरखेड भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते,युवा मोर्चा अध्यक्ष परमानंद पाटील कदम,पत्रकार विजय कदम,डॉक्टर आनंदराव राणे,अंकुश वानखेडे,श्रीकांत कळसे, लक्ष्मण वाठोरे उपस्थित होते