
हा ‘विकसित महाराष्ट्र, सक्षम शेतकरी आणि समृद्ध समाज’ या दृष्टिकोनाला दिशा देणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त) अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप आहे. शेतीसाठी सिंचन, जलयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, बळीराजा मोफत वीज योजना, दिवसा वीजपुरवठा, बळीराजा शेत व पांदण रस्ते यामुळे शेतकऱ्यांना नवा आत्मविश्वास मिळणार आहे. समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ विकास, बरोबरच बळीराजा शेत व पाणंद रस्ते, घरकुल, उद्योग, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेतील. हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी आश्वासक विकासाची हमी.